सोलापूर दूध संघातील भ्रष्टाचारी लोकांच्यावर कारवाई का नाही? त्यांना अभय का दिले गेले? आमदार अभिजीत आबा पाटील यांचा संतप्त सवाल
या भ्रष्टाचारामध्ये दोषी असणाऱ्या लोकांना निलंबित का करण्यात आले नाही? मंत्रालयातूनच चौकशी का रद्द करण्यात आली ?भ्रष्टाचार सिद्ध झाल्यानंतर ही संचालक मंडळ पूर्ववत का केले ? अशा प्रकारांना अभय देण्याचा शासनाचा हेतू काय? दूध उत्पादक शेतकरी आणि जनतेच्या पैशाचा अपहार करणाऱ्यांना अभय देणे म्हणजे अन्यायाला पाठबळ देणे होय. या विरोधात आम्ही आवाज उठवत राहू आणि दोषीवर कठोर कारवाई करण्याबाबत ठोस भूमिका घेण्यात येईल. असा इशारा आमदार अभिजीत पाटील यांनी यावेळी दिला. ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे विधानसभा पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्य दुध महासंघात अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई का नाही? या प्रश्नाला जोडून आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले की सोलापूर जिल्हा दूध संघात अशा स्वरूपाचा प्रकार घडला होता. त्यावर 83 आणि 88 अंतर्गत चौकशीत झाली संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. परंतु मंत्रालयात पोहोचल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही चौकशी रद्द करत संचालक मंडळ पुन्हा पूर्ववत केले .हा सर्व प्रकार म्हणजेच स्पष्टपणे भ्रष्टाचार सिद्ध झाल्यावरही शासन त्यावर कठोर पावले न उचलता दोषीना अभय देत असल्याचा स्पष्ट संदेश समाजात जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे .असे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी ठामपणे विधानसभेत सांगितले.
No comments:
Post a Comment